वृत्तसंस्था : मुंबई देशातील बँकिंग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी केले. शेअर बाजारात बँकेच्या समभागांची किंमत घसरल्यास त्याचा संबंध बँकेच्या आर्थिक स्थितीशी जोडणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येस बँकेवर घालण्यात आलेले निर्बंध आणि करोनाच्या फटक्यामुळे बँकेच्या समभागांची घसरलेली किंमत या विषयी दास यांनी आपले मत व्यक्त केले. बँकेच्या ठेवीदारांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता घाबरून रक्कम काढण्यावर भर देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्जे होणार स्वस्त ; RBI ची व्याजदर कपात
'गेल्या काही दिवसांमध्ये करोना विषाणूमुळे देशाच्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार निर्माण झाल्याचे आपण पाहात आहोत. त्यामुळे बँकांच्या समभागांच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊन खासगी बँकांमध्ये जमा केलेली रक्कम काढण्याच पवित्रा घेतला आहे. संबंधित बँकेच्या शेअर बाजारातील समभागाच्या किमतीचा आणि बँकेच्या आर्थिक स्थितीचा संबंध जोडणे चुकीचे आहे,' असे दास यांनी स्पष्ट केले.
नफावसुली ; सोने दरात झाली घसरण
खासगी बँकापूर्णपणे सुरक्षित; 'RBI'चा निर्वाळा
• SANGAM KOTALWAR